‘अंकुर’ : ही कविता जीवनातील नश्वरतेचा दिलासा प्रेमात शोधणारी कविता आहे, असे मला मनापासून वाटते
या कवीने नेहमीच जिथे जे कमी पडलेले आहे, तिथे ते उधळून दिलेले आहे. आभाळाचा आनंद असलेल्या पावसाच्या थेंबात कवीने आपले अश्रू मिसळून टाकलेले आहेत. काळोख सांडणाऱ्या प्राजक्तात आपला प्रकाशमय देह वितळून टाकलेला आहे. दु:खांनी पेटून उसळलेल्या सागरात तो लाट होऊन मिसळून गेलेला आहे. शब्दच या कवितेची लेकरे आहेत. ती कल्पनाशक्तीच्या फांद्यांवर वस्ती करणारी पाखरे आहेत.......